पोस्ट्स

ऑडिसी

 नोलनचा बहुचर्चित ऑडिसी थिएटर मधे पाहिला. मॅट डेमन, ॲन हॅथवे, टॉम हॉलंड, झेंडेया, लुपिटा आहेत. ऑडिसी येथे शाळेत वाचून झालेलं असतं बरेचदा. बऱ्याचशा ग्रीक कथा माहिती असणारे सुद्धा भरपूर आहेत. माझ्या सारखे कोरी पाटी असणारे प्रेक्षक ज्यांना ट्रोजन हॉर्स शिवाय फार काही माहिती नाही असे फार कमी असतील. पण मी पूर्वाभ्यासाशिवाय विहिरीत उडी घेऊ शकते, पिक्चरचे काय एवढं! असा विचार करून तसेच तोंड वर करून गेले. काहीही अडलं नाही, चित्रपट अगदी सहज समजण्यासारखा आहे. तुम्हाला कुतूहल वाटून वाचून जावं वाटत असेल तर जा पण चित्रपट समजणार नाही असे नाही इतका सरळ मांडला आहे. होमर नावाचा ग्रीक व्यास मुनी ( माझा भाऊ म्हंटला कालिदास म्हण , व्यास जास्त झाले) यांनी जी दोन महाकाव्ये लिहिली, त्यापैकी ओडिसीयस राजाची गोष्ट ही ओडिसी. हे मूळचे ग्रीक महाभारत समजून मधेच अर्जुनाच्या बारा वर्षे वनवास फक्त वेगळा काढून त्याचीच एक स्वतंत्र गोष्ट केली आणि अर्जुनाला समुद्रात ढकलून त्याचा नेहमी एक फळी मिळून वाचणारा सिंदबाद केला तर जे तयार होईल तसेच वाटले. मूळ ग्रीक देवता व त्यांची संतती, शाप- वरदान वगैरे फार खोलवर न जाता केलेला ...

सतलुज

 सतलुज" पाहिला. जबरदस्त चित्रपट आहे. सर्वांनी पाहायला हवा. शेवटी अगदी हृदय पिळवटून निघते. मी आता सगळंच लिहिणार आहे बहुतेक. स्पॉयलर्स असतील. त्यांनी सतलुजच लिहिले होते हिंदी नामावलीत म्हणून मी तेच लिहिले. Bollywood Music जसवंत सिंह कालरा नावाचा साधासा बॅंकेतील कर्मचारी आणि मानवी हक्कांसाठी लढणारा कार्यकर्ता ( दलजित दोसांजी) याच्या धैर्याची आणि शौर्याची कथा आहे. कथेची सुरुवातच त्याचा बेपत्ता मित्र आणि नंतर त्या मित्राला शोधण्यासाठी वेडी झालेली त्याची आई - तिला शोधताना होते. आधी पोलीसांची मदत घेण्याचा प्रयत्न करतात पण उडवून लावलं जातं, मग जंग जंग पछाडण्यात सरळ अंतिम संस्कार ज्या स्मशानात होतात तेथे पोचतात, सगळी बेवारस प्रेतं आहे असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिलेली असतात. त्यांची नावासहित नोंदणी केलेली त्यांना त्या स्मशानातील यादीत सापडते. तेथून कळत जातं की अशी पंचवीस हजार लोक बेपत्ता आहेत व त्यांना त्यांच्या घरचे लोक शोधत आहेत आणि एकीकडे बेवारस म्हणून शेकडो मृतदेहांची विल्हेवाट लावली जाते आहे. Movies हे सगळे दहशतवाद कमी करण्यासाठी "मारलेले" , खलिस्तानी चळवळींविरूद्ध "म...

मराठी चित्रपट - फ्रेम

 प्रचंड प्रेडिक्टेबल वाटला. नागराज मंजुळे आणि अमेय वाघ दोघेच आहेत खरेतर. त्यातही मंजुळेच आहे स्क्रीन वर. सतत सिगारेट फुंकतो, स त त . एकही नॉर्मल श्वास नसेल घेतला मी मधेमधे मोजत होते. लग्न अपयशी, घटस्फोट. व बाप म्हणून मुलीशी दुरावलेला. स्वतःच्याच अलूफ गुहेत रमलेला, प्रसंगी चिडका, मधेच हळवा. नको तेथे अवास्तव रिॲक्ट करणारा, जेथे आवश्यक आहे तेथे मात्र उगाच स्थितप्रज्ञ असा वाटला. Language Resources कामं दोघांची चांगलीच आहेत. फोटो जर्नलिझम आणि त्याचे एथिक्स किंवा संवेदनशीलता. हळूहळू सरावत गेलो की नीतिमूल्ये बाजूला जाऊन फोटोग्राफर म्हणून पुढे येण्यात चढाओढ कशी सुरु होते. चांगला माणूस चांगला जर्नलिस्ट होऊच शकत नाही किंवा त्याच्या उलट. सगळीकडे संधीसाधू व्यावसायिकता व व्यवहार. आत्महत्या असली तरी आधी फोटो, अपघात असला तरी आधी फोटो. आमचं काम फोटो काढणं! तोही बऱ्याचदा "स्टेज" केलेला त्यामुळे तथ्य किती आणि मसाला किती कळणं अशक्य आहे. जास्तीत जास्त उद्विग्नता येऊन खप वाढावा, प्रसिद्धी मिळावी असे फोटो काढणारे करिअर मधे पुढे जाणार. या दृष्टीने सिनेमात भूकंपाचा धक्का बसून बेचिराख झालेले गाव व ते...

धुरंधर - परिक्षण

इमेज
आज थिअटरमधे पाहून आलो. मला खूप आवडला. हिंसाचार, रक्तपाताचे काही वाटत नाही गॉट पाहिल्यापासून. जाट मधे तर 'आपने मेरी इडली गिरायी' म्हणत उगाचच केला आहे तसा येथे वाटला नाही. कथेमुळेच ते येत जातो, चित्रपटाचा प्रकारच ॲक्शनपट/ मारामारीचा आहे. मला चित्रपट खूप स्ट्रेट फॉरवर्ड, किंवा लिनिअर वाटला. खूपच क्लीन मुव्हमेंट असलेली ॲक्शन आहे. अजिबात "क्लम्जी" नाही, रक्तपात असूनही एकदम स्पष्ट आणि स्वच्छ हालचाली आहेत. वेगवान आहे पण एंगेजिंग आहे. मला सर्वात जास्त रणवीरचेच काम आवडले. अक्षय खन्नाचे चांगले आहेच पण त्याची हाईप जास्त आहे. सोशल मीडिया वर सगळ्या रील्स त्याच्याच आहेत. घाऱ्या डोळ्यांचा रगेड, मधूनच हरवल्यासारखा , कव्हर उघडे पडू नये म्हणून सहन करणारा, योग्य वेळेची वाट पाहणारा, पटत नसतानाही सहभागी होणारा, प्रसंगी आपल्याच देशातील घातपात बघून अश्रू पुसून अतिरेक्यांसोबत जयघोष करणारा - असे अनेक पदर असलेली भूमिका आहे. त्यामानाने इतरांच्या वरवरच्या आहेत. अर्जुन रामपाल त्याला जे येते ते करतो, क्रूर भूमिका आहे. पण फार आव्हानात्मक नाही. त्यामानाने राकेश बेदीची लेयर्ड आहे, कारण तो कुणाचाच नाह...

चित्रपटांच्या संदर्भ लिंक

इमेज
  धडक २ https://www.maayboli.com/node/87006?page=26 अतिशय संयत हाताळणी आहे त्यामुळे जास्त आवडला. त्यातला जातीपातीचा भाग गृहित न धरताही कलाकृती म्हणून सुद्धा व्यवस्थित मांडणी असलेला वाटला. कितीही प्रक्षोभक आणि भडक करता आला असता पण मग इतका नेमका पोचला नसता असेही वाटले. संवेदनशील मनाची कथा आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगणाऱ्यांची व जग चांगले असू शकते आपण आपलं शिकून मोठे होऊ याविचारांचा थोडा भाबडा व प्रामाणिक नायक आणि नायिका आहेत. तृप्ती दिमरीला अगदी सटल मेकप आहे, कुणीही ग्लॅमरस दाखवलं नाही. संवादही प्रवचनासारखे न वाटता योग्य अनुषंगाने आलेले वाटतात. आवेश नसूनही डोळ्यात पाणी येणाऱ्या घटना आहेत. माहितीपट पण जरा व्यावसायिक असं म्हटलं तरी चालेल. माझा आता कसल्याही समानतेच्या काल्पनिक नंदनवनावर किंवा "असं कुठं असतं का, मी तर कधी केलं नाही, पाहिलं नाही" - इत्यादी वर विश्वास नाही. People are generally mean and insecure, they can do anything for anything असं हल्ली वाटतं. त्यामुळे ह्या वर माझा सहज विश्वास बसला, अर्थात हाताळणी अतिरंजित नाही हे ही मोठं कारण आहे. अति केले की कथा न पोचता आपण...

मी वाचलेले पुस्तक - संदर्भ लिंक

इमेज
  मी वा पु वरील - existential crisis वरील पोस्टी आणि चर्चा ( ऑक्टोबर २०२५) https://www.maayboli.com/node/81478?page=53 राम आणि कृष्ण - या दोघांवरील पोस्टी (जानेवारी २०२६) https://www.maayboli.com/node/81478?page=59

इरादा

इमेज
  काल इरादा (Irada) नावाचा सुंदर चित्रपट पाहिला. यूट्यूब वर Iraada नावाचा शत्रुघ्न सिन्हाचा एक सिनेमा आहे , तो हा नाही. यात नसिरुद्दीन शाह, अर्शद वारसी, दिव्या दत्ता आणि शरद केळकर, सागरिका घाटगे आहेत. सर्वांची कामं फारच भारी झालेली आहेत. पर्फॉर्मन्ससाठी पहावेत असे सिनेमे हल्ली निघत नाहीत, हाही २०१७ चा आहे. खऱ्या घटनेवर बेतलेली कथा आहे. भटिंडा येथील थर्मल- पावर प्लॅन्ट मुळे तेथील कनाल, नदी यात सोडल्याजाणाऱ्या कार्सिनोजेनिक केमिकल्स मुळे प्रत्येक घरात कॅन्सरचे रुग्ण सापडायचे. यावर काही वर्षांपूर्वी पेपरमध्ये छापून आले होते. युरेनियमने होणारी विषबाधा, रिव्हर्स बोअरिंग, फर्टिलायझर मधून होणारी विषबाधा - या सगळ्यामुळे होणारे "इको - टेरेरिझम" यावर कथानक बेतलेय. थ्रिलर सिनेमा आहे. नसिरुद्दीन शाह एक रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहे, मुलीला सुद्धा एअरफोर्स मधे पायलट करायचं स्वप्न आहे. त्यासाठी तिला रोज कॅनालमधे पोहण्याच्या सरावासाठी घेऊन जातो जेथे हे केमिकल्स सोडलेले असतात. ते पाणी नाकातोंडात जाऊन ती तडकाफडकी कॅन्सरने मरून जाते. तेथूनच सगळा प्रतिशोध सुरू होतो. शरद केळकर या थर्मल प्लान्टचा मालक...