पोस्ट्स

आध्यात्मिक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Can you hear the music!

इमेज
  वैधानिक इशारा* जड-आध्यात्मिक लेख आहे, परत फिरा.   डेकार्टच्या मते आपण विचार करतो म्हणून आपण 'असतो', I think therefore I am ! पाश्चिमात्य तत्त्वज्ञान कुठेतरी विचारांतच अडकून पडले आणि पौर्वात्य त्यामानाने कितीतरी पुढे 'निर्विचारी' अवस्थेत गेले. अद्वैतवाद हा त्याहीपुढे जाऊन आत्म्याचे खरे रूप दाखवतो. त्यामुळे ज्यांना खऱ्याखुऱ्या अध्यात्माची ओळख हवी आहे, त्यांना जगभर फिरून पुन्हा घरी परतावेच लागते. पण फिरावंही लागतं , कारण इतर संस्कृतीतील अध्यात्मिक गूढ हे आपल्या आयुष्यातही टप्प्यांसारखे येतच असते. एका भटक्यानी एकदा बुद्धाला थेट विचारलं , 'परमात्मा' अशी काही गोष्ट खरोखरच अस्तित्वात असते का ? बुद्धाने उत्तरादाखल मौन धारण केले. कारण कुठलंही उत्तर दिलं असतं तरी ते चुकीचंच ठरलं असतं. प्रज्ञेच्या प्रांतात येणाऱ्या गोष्टी ह्या त्या अनुभूती दरम्यानच अस्तित्वात असतात. जेव्हा आपण त्याला काही तरी नाव देत असतो ती अनुभूती नष्ट होत असते. जरा-व्याधी-मृत्यू यांच्यापासून अलिप्त असणाऱ्या तेजस्वी परमतत्त्वाला बौद्धप्रणालीत 'तथागत-गर्भ' असेही म्हणतात. एखादी गोष्ट गूढ असली की

कबिरास पत्र

इमेज
  मराठी भाषा गौरव दिन २०२३ निमित्त स.न.वि.वि. या उपक्रमात भाग घेतला होता, त्यात कुणालाही पत्ररूपी लेख लिहायचा होता. यावर्षी मी म भा गौ दि निमित्ताने मायबोलीवर संयोजनातही भाग घेतला होता.  प्रिय कबीरा, तुला काही कल्पना नाहीये इथे काय चाललंय , त्याने माझ्यासारख्या किती जणांचा गोंधळ होतोय. ज्यांना आत्मशोधाची जिज्ञासा आहे त्यांची दिशाभूल करायला इथे सर्वस्व वेचणारी लोक आहेत. असत्याबाबत केवढी एकनिष्ठता, आणि सत्याशी म्हणजे तुझ्या कैवल्याशी काही देणेघेणे नाही. आजकाल आस्तिक कोण नास्तिक कोण कळत नाहीये. बहुतांश जनता इतकी मूर्ख - व्यक्तिपूजक आहे की One Sadguru goes another comes ! सारासार कळणाऱ्यांना तूही असाच असला पाहिजेस असं वाटतं, न कळणाऱ्यांना तुला जाणूनच घ्यायचे नाही. हे म्हणजे अर्धे आंधळे व उरलेल्यांच्या डोळ्यावर पट्टी अशी अवस्था आहे. आता महाभारत झालं तर काय नवल..! त्यांना जीव तोडून सांगायला माझ्याकडे कसलाही पुरावा नाही , माझं काय मी आज आहे उद्या नाही पण तू तर चिरंतन आहेस, तुला काहीच कसं वाटत नाही. दिसामागून दिसं चाललेत, जे आहे त्याला साक्षात्कार का मानू मी तरी! 'तेरे बिन खाली आजा खालीपनम

काही गाणी आणि आरस्पानी

इमेज
       काही गाणी आणि आरस्पानी     बन लिया अपना पैगंबर    तैर लिया सात समंदर    फिर भी सुखा मन के अंदर    क्यों रह गया    रे कबिरा मान जा....    रे फकिरा मान जा..   आजा तुझको पुकारें तेरी परछाईंया     साप जसा कात टाकतो तशी मी लिहिते,  दुसरी इतकी चपखल आणि क्रीपी उपमा याक्षणी तरी आठवत नाही. काही तरी साचल्यासारखं वाटतं , व्यक्तं झालं की मोकळं होऊन आपापल्या मार्गाला जाता येतं. सापाला त्याचाच भाग असलेल्या काती विषयी काही विशेष आसक्ती वाटत नाही पण मुक्तताही हवी असते आणि सक्तीही नको असते, तसंचं काहीसं होऊन बसतं, बहुतेक मी विचित्र आहे, माझा प्रवास आरस्पानी असावा एवढाच आग्रह आहे !     प्रवासात काही का येईना सगळी बेटंच आहेत, ध्रूवपद नाही, हे कळाल्याने बहुदा बऱ्याचशा गोष्टी 'whatever' गटात गेल्यात. भारतातून परत येऊन तीन महीने होतील, यावर वैयक्तिक न होता लिहावं असं वाटलं. पण पझलचे हजारो तुकडे एकदाच अंगावर पडल्यावर कसं लिहिणार. जे मलाच कळत नाहीये ते कसं बांधणार, वाचणाऱ्याला कसं समजणार !!! अधिकतर आठवणी स्मृती होतात, काही आपलाच अंश होऊन पुनःप्रत्ययाचे ecstatic झटके देत रहातात.     बंध

अपरिग्रह मनाचा !

इमेज
  अपरिग्रह मनाचा ! मला लहानपणापासून आयुष्याविषयी फार प्रश्न पडतात , त्यात नैराश्य नाही (मी एक आनंदी मुलगी आहे) तर केवळ निखळ जिज्ञासा असते. आई कोरोनाने गेल्यापासून मला मृत्यु विषयी सुद्धा प्रश्न पडायला लागले. एकदम अदृश्य झाली ती , मला काही सांगायचं बोलायचं असेल तिला , निरोपसुद्धा नाही घेतला. मी सातासमुद्रापार , काही अर्थ नाही कशाला. काही तरी आयुष्याशी नातं होतं त्यातून स्वतंत्र वाटायला लागला, म्हटलं तर निर्मूळ म्हटलं तर मुक्तं. नेमक्या कुठल्यातरी भावना आपण पकडून ठेवतो व त्याला आयुष्यं समजतो, समजा एकेदिवशी त्या भावनाचं अदृष्य झाल्यानंतर जे उरते ते काय असते ??! म्हणजे जी आधी होते ती मी होते की ही उर्वरीत मीच खरी मी आहे. माणूस म्हणजे भावनांच्या संचयाने ओतप्रोत असलेला मातीचा गोळा आहे. मृण्मयं आहे , मगं या मृण्मयातलं चिन्मयं कुठे आहे?! सारखं काही नं काही गोळा करायचं आणि त्यामुळे होणाऱ्या परिग्रहाच्या व्याप्तीवरून आयुष्याचं सामृद्ध्यं जोखायचं. दृश्य-अदृश्य ओझं जपायला जीवाचं रान करायचं , जणू हीच आपली ओळख आहे. ठराविक आकाराची माती, ठराविक आवडीनावडी, ठराविक सुखदुःख, भावना , आनंद, राग, लोभ हा पसार

भजेहम् भजेहम्

इमेज
  श्रीहरी स्तोत्रम्  ऐकून आलेली विचारमौक्तिकं ललितामध्ये ओवण्याचा प्रयत्न केला आहे. ************ तूच नारायणा ,कधी गळ्यात पुष्पहार घालून बसतोस आणि मी तुला हरी हरी म्हणून हाका मारते आणि तू 'ओ ' तर देत नाहीसच पण सर्पमाळ व रूद्राक्षाने सुशोभित होऊन येतोस. मगं मला वाटते की हा आशु-तोष तर नक्की ऐकेल.. मला कधी कळणार की तुम्ही एकच आहात. मला वाटायला लागते तुम्हा पुरुषांना का कळणार माझी अस्वस्थता , माझे स्त्रीह्रदय! हा विचार जणू तुला कळला की तू प्रकटतोस ती जगदंबा होऊन. तिच्यात मगं मी माझी आई शोधते . ती माझ्या रूदनाकडे दुर्लक्ष करू शकणार नाही अर्थातच ! सर्व रेणूंना कारण असणारी रेणुका म्हणते मला सुक्ष्मात शोध बाळा. आता आली की पंचाईत ! माझ्या संसारी दृष्टीत मात्र आसक्तीच भरलेली असल्याने मला कसं दिसणार. हा माझ्या दृष्टीचाच नाहीतर बुद्धीचाही दोष आहे असे मानूण मी गणरायाला आर्त करते. तो माझ्या दृष्टीपथातले विघ्न दूर करतो व शारदाकृपेने मतीवरही प्रकाश पडतो. ती जगदंबा, तो विनायक, ती सरस्वती तूच आहेस मला कधी कळणार. भगवद्गीता वाचावी म्हणाले तर कुठे अर्जुन कुठे मी ?! पुत्रप्रेमाणे आंधळा झालेला तो धृतर

पराधीन आहे जगतीं व तुझे रूप चित्ती

इमेज
  पराधीन आहे जगतीं व तुझे रूप चित्ती दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा? पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात? दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत? वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा पराधीन आहे जगतीं पुत्र

निर्गुणी भजन - राम निरंजन न्यारा रे

इमेज
  निर्गुणी भजन - राम निरंजन न्यारा रे कबीरांचं नावं सुद्धा लावायची गरज वाटली नाही कारण राम आणि कबीर एकच ना.. ..आधी वाटलं की शीर्षकात पुढे काही अर्थ , अन्वय , विवेचन द्यावे का पण नाही ते ह्या निरंजन रामाला लागलेले अंजन- किल्मिष वाटलं मलाच .... मी कोण अर्थ लावणारी जे कबीराला ऐकताना झिरपलं आणि विशुद्ध भाव फक्त उरला तो व्यक्त करायला ह्या काळ्या चिन्हांचा आधार...अक्षरांची केविलवाणी धडपड. जे मुक्त आहे अव्यक्त आहे ते व्यक्त करायला पुन्हा त्याला बंधनात टाकावं लागलं... विरोधाभासच नाही का! बायबलमध्ये* लिहीलयं की "In the beginning was the word and the word was God " ह्याचा नेमका काय अर्थ असेल याचा मी बराच विचार केला. कुणी म्हणे ओम , कुणी आमेन कुणी अजून काही पण मला हा शब्द ,शब्द नाही तर नाद या अर्थाने जास्त योग्य वाटतो. शब्दाचे सुक्ष्मरूप नाद. कोणी ऐकले नसेल तर नादाची कल्पना करता येत नाही ज्यांनी ऐकलाय त्यांना सुद्धा नेमके काय ऐकले हे सांगता येत नाही. त्या नादब्रह्माला सुद्धा "शब्द' म्हणून बद्ध व्हावे लागले. कारण अव्यक्ताला व्यक्त करण्यासाठी शब्द कुठून आणनार.. मगं त्यालाच उत्तमो

करदे मुझे मुझसेही रिहा , मारा आणि कोहंसोहं

इमेज
करदे मुझे मुझसेही रिहा , मारा आणि कोहंसोहं           कुन फाया कुन  हे सूफी गाणे मला आवडते. ह्या तथाकथित बंड लोकांबद्दल त्यांच्या झपाटलेपणामुळे एक गूढ आकर्षण वाटते. खासकरुन या गाण्यातील त्या ओळी ज्यात "अब मुझकोभी हो दिदार मेरा , कर दे मुझे मुझसेही रिहा" अशी आर्त आळवणी आहे. माझ्यापासून मला रिहा /मुक्त / स्वतंत्र कर म्हणजे नक्की काय असेल ? नेमक्या कोणत्या अदृश्य तुरुंगात आहोत आपण जो दिसत नाही, जाणवत नाही. मग त्यातून बाहेर निघण्याचा आपण प्रयत्न तरी का करणार आणि कसा करणार !          मला नेहमीच वाटते की मी या ग्रहावरची नाही, या जगातलीच नाही . कुठल्यातरी अधिक चांगल्या ग्रहावरून झालेल्या चुकांमुळे पतन होऊन मी इथे आले आहे. प्रत्येकाला असा अनुभव आयुष्यात कधी न कधी आलाच असेल. या चाकोरीचा या साचेबद्धतेचा कंटाळा येऊन एक प्रकारची बधीरता येते. मगं आपण अस काही तरी ऐकतो, बघतो, वाचतो किंवा अनुभवतो की एक क्षण स्वतःच्या स्व-स्वरूपाशी जोडल्या जातो. तो आनंदाचा क्षण जो खरे तर क्षणीक वैराग्यामुळे अनुभवला आहे तो आपल्या मनाला पुन्हा त्या संसारचक्राला जुंपतो. आणि आपण नात्यांच्या आभासी बंधनांशी पुन्हा ए